पावसाच्या भीतीने शेती मशागतीच्या कामांना वेग; शिवारातुन शेतकरी महिलांची वर्दळ वाढली
भोर तालुक्यात सर्वत्र मे महिन्यात बरसलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीच्या कामात खंड पडला होता परंतु चार पाच दिवसापासुन पावसाने उघडिप दिल्याने भोर तालुक्यासह ग्रामीण भागातसह सर्व ठिकाणी शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे सर्वत्र खरीपाचा हंगाम सुरू झाला असली अजुन जादा ओलीमुळे भात खाचरे, कडधान्ये खाचरे यांची मशागती पेरणी योग्य झाल्या नाहीत. कडधान्ये ,भात तरवे पेरण्याकरीता शेतकरी आपली खाचरे बैलाचे औत , ट्रॅक्टरच्या साह्याने वजावणी करत पेरणी योग्य करत आहे. यावर्षीही बैल जोड्या कमी असल्याने ट्रॅक्टरच्या वजावणीला अधिक पसंती दिली जात आहे.भात हे महत्त्वाचे पीक असल्याने पाऊस कधीही कोसळू शकतो या भितीने बळीराजा भात तरवे पेरणीसाठी लगबगीला आला आहे. सर्वत्र शिवारातुन शेतक-यांची ,महिलांची वर्दळ दिसु लागली आहे.
यावर्षी मान्सूनच्या आगमना अगोदर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. मान्सून लवकर दाखल होणार म्हणून शेतक-यांनी बी बियाणे जलद गतीने खरेदी केली होती. ज्या ठिकाणी अवकाळी ,वळीव पाऊस थोड्याफार प्रमाणात झाला होता त्या ठिकाणच्या लोकांनी, शेक-यांनी भात तरवे पेरले होते, तर काही भागात लवकर पाऊस येणार म्हणून धुळ वाफेवर पेरणी केली होती.मे च्या मध्यंतरी व शेवटच्या आठवड्यात सर्वत्रच मोठा अवकाळी पाऊस कोसळल्याने चहुकडे शेतातुन खाचरातुन पाणीच पाणी झाले होते. अशात चार पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी सर्वत्र शेताच्या कामात शेतकरी गुंतला आहे .भात तरवे पेरणीचा अवधी निघून जाईल , पाऊस झाला तर घात येणार नाही, भात बियाणे वाया जाईल अशा भितीने शेतकरी बैल औताची , ट्रॅक्टरची वाट न पहाता मिळेल त्या घरगुती शेती अवजाराच्या साह्याने भात तरवे पेरणी करत आहे. ब-याच ठिकाणी शेतक-यांनी घरगुती सायकल कोळप्याला पसंती देत तरवे पेरले आहेत असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.