भोरः शहरातून अवैध पद्धतीने प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांचे याकडे अक्षम्य दुर्लभ होत असल्याचे बोलले जात आहे. भोर शहरात गावपाड्यावरून वाड्या वस्त्यांवरून मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात. त्यांना शहरात येण्यासाठी खाजगी चारचाकी वाहनांनी प्रवास करावा लागतो. मात्र, खाजगी वाहन चालकाकडे प्रवास करण्याचा परवाना नसताना देखील प्रवासी वाहतूक केली जात आहे.
तसेच वाहन पूर्ण क्षमतेने भरलेले असताना देखील अतिरिक्त प्रवासी वाहनात बसविण्यात येत आहेत. यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका होऊ शकतो. शहरात एक खाजगी चारचाकी वाहनात जागा नसाताना देखील दोन विद्यार्थीदशेतील मुलांना संबंधिताने वाहनाच्या टफावर बसविले होते. समजा काही अपघात झाल्यासा याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जात आहे. यामुळे अशा प्रकारची वाहतूक करणे वाहतूक करणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्या दोघांसाठी धोकादायक आहे.
वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराला अरेरावी
या प्रकाराची माहिती मिळताच वार्तांकन करायला गेलेल्या पत्रकाराला संबंधित अवैध पद्धतीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यक्तीने अरेरावीची भाषा केली.
पुण्याच्या भोरमधील धोकादायक पद्धतीने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाचा व्हिडीओ आला समोर
- 9 जणांची आसन क्षमता असणाऱ्या खाजगी वाहनात 17 ते 18 प्रवासी बसवून, महाविद्यालयीन दोघा विद्यार्थ्यांना जीपच्या छतावर बसवून धोकादायक पद्धतीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाचा व्हिडीओ समोर आला आहे.
- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून, त्यांना छतावर बसवून वाहतूक सुरू असल्याचे लक्षात येताच एका सजक नागरिकाने आपल्या मोबाईल कॅमेरात हा प्रकार कैद केला.
- सदर व्यक्ती व्हिडीओ काढत असल्याचे लक्षात येताच वाहन चालकाने रस्त्यातच वाहन थांबवत, व्हिडीओ का काढत आहे अशी विचारणा करत, कायं करायचयं ते करा,आम्हाला आमचं पोट भरुद्या असं उर्मट उत्तर देत पुन्हा वाहन चालू करून तो वाहन चालक तिथून निघून गेला.
- RTO विभाग आणि पोलीस प्रशासनाचे मात्र अशा अवैध धोकादायक पद्धतीने सुरू असलेल्या प्रवासी वाहतुकीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
- तर दुरसीकडे प्रवाशांना याबाबात विचारणा केली असता, ग्रामीण भागात जाण्यासाठी एसटी बस आणि इतर वाहनांची संख्या कमी असल्याने मिळेल त्या वाहनाने अशा प्रकारे धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागत असल्याची भावना व्यक्त केली.
- यामुळे आता ग्रामीण भागात जाण्यासाठी एसटी बसची संख्या वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.