विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांनी स्वतः चालविली एसटी बस
भोर – भोर -राजगड (वेल्हा)-मुळशी विधानसभा मतदारसंघातील एसटी बस सेवा अधिक सक्षम सोयीची व्हावी ,ग्रामीण भागातील जनतेला एसटीच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी सुरुवातीस माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नामुळे व नंतर विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्याने भोरला पाच नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.सदर बसेसचा लोकार्पण उद्घाटन सोहळा आज शुक्रवार ( दि.६) शिवराज्याभिषेकाचे सोहळा दिनाचे औचित्य साधून सकाळी नऊ वाजता माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते व नंतर दहा वाजता विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते भोर बस स्थानकात फटाक्यांच्या आतेषबाजीत पार पडला . यावेळी आगार प्रमुख रमेश मंथा , प्रदिप इंगवले ,राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, चंद्रकांत बाठे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, केदार देशपांडे , अतुल काकडे,कुणाल धुमाळ , ॲड कपिल दुसंगे, प्रा गायकवाडसर , भोलावडेचे सरपंच प्रवीण जगदाळे , प्रशांत पडवळ भाजपाचे पल्लवी फडणीस , अमर बुदगुडे, राजेंद्र गुरव , पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक खुटवड , गोपनीय पोलीस अभय बर्गे, वाहतूकचे पोलीस सुनील चव्हाण, होमगार्ड व भाजपसह ,राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (शिंदे)या तिनही पक्षाचे महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांनी स्वतः चालविली एसटी बस – यावेळी विद्यमान आमदार शंकर मांडेकर आपल्या सहकाऱ्यांना एसटीमध्ये बसवून स्वतः एसटी बसचे स्टेरींग हातात घेत स्व:ता एसटी बस चालविली. आमदार मांडेकर हे एसटी बस स्वतः चालवत आहेत हे पाहून आजूबाजूच्या सर्व लोकांनी आमदारांचे भरभरून कौतुक केले .
भोरला अजूनही श्रेयवादाची लढाई कायम ?
भोर राजगड मुळशी या तीनही तालुक्यात विधानसभा मतदारसंघात आजी-माजी आमदारांच्या श्रेयवादाची लढाई कायम असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे ती लढाई अजूनही अविरतपणे सुरू असुन संपत नाही ते दोघेही महायुतीत असले तरी प्रत्यक्षात मात्र एका मंचावर येण्यास टाळाटाळ करीत आहेत. रस्ते, पाणी ,वीज,रोजगार,विविध प्रशासकीय योजना, औद्योगिक प्रकल्प, शैक्षणिक, पर्यटन स्थळे, वाहतूक एसटी बस सेवा अशा सर्वच बाबतीत दोन्ही आमदारांकडून श्रेयवाद दाखवला जातो . प्रत्येक ठिकाणी एकाच कामांचे दोन दोन वेळा भूमिपूजन उद्घाटन होते त्यामुळे जनतेत मात्र कोणी खरच काम केले याचा संभ्रम निर्माण होत असुन श्रेयवाद लढाई अबाधित आहे