राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन कार्यक्रम २०२५-२६
भोर तालुक्यातील येवली (ता.भोर) येथे शनिवार (दि.२४) राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत दिशानिर्धारण/ अभिमुखता (ऑपरेशन ) घेण्यात आला यावेळी नैसर्गिक शेती ही काळाची गरज बनली असुन नैसर्गिक शेती केल्यास सर्वांचे आरोग्य जपणार असून विषमुक्त अन्न मिळणार आहे कारण विषमुक्त नाही आता सध्या काळाची गरज आहे असे प्रतिपादन भोरचे मंडळ कृषी अधिकारी २ प्रशांत सरडे यांनी केले . तसेच नैसर्गिक शेती योजनेबाबतची माहिती, रासायनिक शेतीपेक्षा नैसर्गिक शेती कशी श्रेष्ठ आहे व समाजासाठी उपयुक्त आहे याबाबत गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. सदर योजनेत सहभागी शेतकऱ्यांना आठ हजार रुपये अनुदान, जीवामृत, बिजामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क इत्यादी तयार करण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिक ड्रमसाठी सुद्धा अनुदान देण्यात येणार असल्याबाबतचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर भारतीय प्राकृतिक जैविक निविष्ठा संसाधन केंद्र यासाठी एक लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
शेतीमध्ये अधिक उत्पादन मिळावे म्हणून रासायनिक खतांचा , रासायनिक किटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे .त्यामुळे जलसाठे, शेतीतील अन्न विषारी बनत चालले आहेत. तसेच जमीन कडक होऊन नापीक होत चालली आहे. निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. शिवाय मानवी आरोग्य धोक्यात आलेले आहे .त्यामुळे नैसर्गिक शेती करणे हेछ फायदेशीर ठरणार आहे. बारे खुर्द या गावामध्ये ट्रायको कार्ड निर्मिती केंद्र (हानिकारक अशा किडींची अंडी फस्त करणारे मित्र कीटक) स्थापन करण्यात येणार असल्याबाबत माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.तसेच त्यांनी मधमाशांमुळे कृषी उत्पादनात होणारी वाढ व मधुमक्षिका पालनासंबंधी सर्व शासकीय योजनांबाबत माहिती दिली. त्यांनी दुधाळ गाई-म्हशी, शेळ्या-मेंढ्या, कोंबड्यांची पिल्ले, कोंबड्या इत्यादी पालनासंबंधी अनुदानाचा लाभ घेणेसाठी mahabms.com या वेबसाईटवर दिनांक १ जून २०२५ पर्यंत अर्ज करणेबाबत आवाहन केले आहे. तालुका तंत्रज्ञ व्यवस्थापक लक्ष्मीकांत कणसे यांनी नैसर्गिक शेतमाल मार्केटिंगबाबत मार्गदर्शन केले. योजनेचा लाभ घेण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी,भोर२ यांच्याशी संपर्क साधावा असे त्यांनी सांगितले.