भोरः निवडणुकीच्या काळात भोरमध्ये सर्वाधिक ज्या मुद्यावर राजकारण केले जाते तो मुद्दा म्हणजे एमआयडीसीचा. गेल्या कैक वर्षांपासून भोरला एमआयडीसी होणार तरी कधी, याची वाट येथील तरुण पाहत आहेत. अद्यापर्यंत यावर तोडगा निघाला नसल्याने विरोधक विद्यामान आमदारांवर टीकेची झोड उठवताना दिसत आहे. यातच आता आमदार संग्राम थोपटे यांनी एका यूट्यूब चॅनेल दिलेल्या मुलाखतीमध्ये या प्रश्नावर स्पष्टीकरण दिले आहे.
नक्की विरोध कुणाचा?
या विषयावर मी चार बैठका घेतल्या आहेत. तसेच, स्थानिक शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे. या विषयावर 1992 सालीचा प्रस्ताव आहे. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी गावा गावात जाऊन बैठका घेतल्या. त्यामध्ये 67 टक्के शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे समोर आले असल्याची माहिती थोपटे यांनी दिल्या. याचे रेकॉर्ड त्यांच्याकडे असल्याचे ते यावेळी म्हणाले. परंतु, याला नक्की विरोध कुणाचा? यावर बोलताना ते म्हणाले, अनेक ग्रामपंचायत या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत असे म्हणत त्यांनी या प्रकल्पाला विरोध म्हणून माझ नाव घेतले. पण विरोध करणाऱ्या लोकांना सांगितलं नाही की विरोध करू नका, असे थोपटेंनी सांगितले.
मी काय केले याचे रेकार्ड आहे, तुम्ही काय केले ते सांगाः थोपटेंचा विरोधकांना सवाल
निवडणूक आली की संग्राम थोपटे यांनी 5 वर्षात काय केले असे म्हणणारे विकास कामांना विरोध करतात असा आरोप त्यांनी विरोधकांवर केला आहे. चाकणमध्ये 85 लाख रुपये हेक्टर जमिनीचा रेट होता. तर भोरला मागितला 5 लाख रूपये गुंठा, असा रेट सरकार कसा देणार? त्यामुळे असा विरोध करून याचे राजकारण ही लोकं करीत असल्याचे थोपटे म्हणाले. तसेच मी काय केले याचे रेकॉर्ड आहे. तुम्ही काय केलं हे सांगा असा प्रतिसवाल थोपटेंनी विरोधकांना विचारला आहे.