खंडाळा: पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून, ही जनसंवाद यात्रा खंडाळा तालुक्यातील गावात आली आहे. खंडाळा तालुक्यावर राजकीय व सामाजिक दृष्ट्या नेहमीच अन्याय झाला असून, तालुक्याच्या स्वाभिमानासाठी माझा गेली २० वर्षे संघर्ष सुरूच असल्याचे प्रतिपादन जाधव यांनी केले.
आमच्या शेतकऱ्यांनी जलसिंचन योजनेसाठी वडिलोपार्जित जमिनी शासनाला दिल्या, मात्र पाण्याचा लाभ दुसऱ्या तालुक्यातील, जिल्ह्यातील लोकांना झाला असल्याचे ते यावेळी म्हणाले. गेल्या ५० वर्षात नायगाव- मांढरदेवी रस्ता लोकप्रतिनिधी करू शकले नाहीत, हे आमचे दुर्दैव असल्याची टीका त्यांनी केली. खंडाळा तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा, बेरोजगारीचा व सामाजिक समस्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी आता एकजुटीने लढावे लागेल, आता आर या पार च्या या लढाईत सर्वांनी गट तट विसरून एकत्र यावे असे आवाहन पुरुषोत्तम जाधव यांनी जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने केले.
यावेळी वाई विधानसभा संघटक संजयसिंह देशमुख, खंडाळा तालुका संघटक सचिन आवारे, बाळासाहेब जाधव लहुजी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष, शोभा जाधव पंचायत समिती सदस्य, भूषण शिंदे खंडाळा तालुका अध्यक्ष ,सचिन धायगुडे, सागर ढमाळ खंडाळा तालुका उपाध्यक्ष, मंगेश खंडागळे माजी शहरप्रमुख, उप तालुका प्रमुख सागर ढमाळ, भानुदास जाधव खंडाळा तालुका सहकारी साखर कारखाना संचालक, कृष्णा बरकडे शासकीय समिती सदस्य, निवृत्ती जाधव माजी सरपंच यांच्यासह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व विविध गावचे सरपंच, उपसरपंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘या’ गावातील नागरिकांशी साधला संवाद
खंडाळा तालुक्यातील हरिपूर, अंबरवाडी, पवारवाडी, अजनुज ,असावली, कण्हेरी, लोहम, झगलवाडी, पिराचीवाडी , लिंबाचीवाडी, जवळे, कवठे ,नायगाव ,पानसरेवस्ती, पिसाळवाडी, भादे ,शेडगेवाडी ,वाठार बुद्रुक, तोंडल, लोणी ,भोळी, शेखमीरवाडी