सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्रामपंचायतीकडुन महत्त्वाची उपाययोजना
भोर पासून दोन किमी अंतरावर असलेली बसरापुर ग्रामपंचायत सध्या नवनवीन उपक्रम राबवत आहे.या गावच्या विद्यमान महिला सरपंच निलम झांजले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामे प्रगतीपथावर आहेत. गावातील नदी किनारी असणा-या स्मशानभूमीवर वीजेची सोय नाही . रात्रीच्या वेळी एखाद्याचे निधन झाले असता अंत्यविधी दरम्यान मोठ्या अडचणी येत होत्या तसेच सुरक्षिततेसाठी या ठिकाणी गावातुन नदीला असलेल्या स्मशानभूमीत वीज (लाईट ) आणण्यासाठी मोठा खर्च येत होता अशातच या गावच्या सरपंच निलम झांजले यांच्या मार्गदर्शनाखाली एका उद्योजकाकडून चक्क पन्नास हजार किंमतीचे तीन सौर ऊर्जा दिवे बुधवार (दि.१८) सायंकाळी या गावच्या स्मशानभूमीवर बसविण्यात आले आहे त्यामुळे तेथील परिसर उजळून निघाला आहे.
या परिसरात या दिव्यांमुळे मोठा प्रकाश पडला असुन सुरक्षिततेच्या दृष्टीने रात्री अपरात्री यांचा मोठा फायदा ग्रामस्थांना होणार आहे. यावेळी या गावच्या सरपंच निलम झांजले, उपसरपंच रामदास झांजले, पोलीस पाटील विठ्ठल झांजले , ग्रामपंचायत शिपाई अनुराधा कुंभारकर तसेच सदर उद्योजकाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सदर उद्योजकाचे गावच्या व ग्रामपंचायतीच्या वतीने सरपचांनी आभार मानले. यापुढेही गावच्या विकासकामात हातभार लावला जाईल असे उद्योजकांकडून सांगण्यात आले.
