राजगडः खेड शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटीची रोख रक्कम आणि इनोव्हा कंपनीची कार राजगड पोलिसांनी हस्तगत केली आहे. या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडालेली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर इतक्या मोठ्या प्रमाणात कॅश कुठे घेऊन जात होते. तसेच यामागे कोणी सत्ताधारी पक्षातील एक बडा आमदाराच्या नावाची चर्चा देखील केली जात आहे. यातच आता कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. यामुळे महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्या खोकेबाजांना इथली जनता OK करुन डोंगर दऱ्या बघण्यासाठी पर्मनंट घरी पाठवणार असल्याची खरमरीत टीका रोहित पवारांनी केली.
सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून 25- 25 कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून, काल यातलीच एक गाडी खेड-शिवापूरच्या डोंगार झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु इथल्या स्वाभिमानी जनतेने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला असल्याचे ते म्हणाले. विधानसभेलाही दलालीतून आलेल्या पैशाच्या जोरावर रात्रीस खेळ करण्याचा महायुतीचा कानमंत्र असला तरी, महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्या खोकेबाजांना इथली जनता ok करुन डोंगर दऱ्या बघण्यासाठी पर्मनंट घरी पाठवणार, हे नक्की आहे. कारण ‘महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं, असे त्यांनी सांगितले.
सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून 25- 25 कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून काल यातलीच एक गाडी खेड-शिवापूर च्या #डोंगार_झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत?
लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून… pic.twitter.com/B9Z4gbqRk7
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 22, 2024