दौंड तालुक्यातील हातवळण येथील हृदयहेलवणारी घटना!
राजगड न्युज नेटवर्क
दौंड :तालुक्यातील हातवळण येथे भीमा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तीन आठवण मुले वाहून गेल्याची घटना केली. दरम्यान तिघांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून दोन मुलांचा मृत्यूदेह अद्यापही सापडले नाहीत.
विशाल दिलेराम सिंग ( वय १६), निखिल नरेषसिंग कुमार (वय १५) व अमित रामेश्वर राम वय १६, मुळ रा. आदवपुर जि. बिजनौर )अशी या मुलांची नावे आहेत.
दरम्यान, याबाबत मिळालेले प्राथमिक माहिती अशी की, हातवळण येथील वसंत विठठल फडके यांच्या गुऱ्हाळावर काम करणाऱ्या मजूर दिलेराम भस्सु सिंग (वय ४५) यांचा मुलगा. विशाल, भाचा निखिल, मेव्हणीचा मुलगा अमित, देव, निपिलकुमार व निरजकुमार असे सहा जण शनिवारी (दि ७) दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास हातवळण येथील भीमा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले होते मात्र यामधील तीघे जण नदीच्या पात्रात वाहुन गेले. घटनेची माहिती मिळताच भिमा नदीच्या पात्रात यवत व पाटस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी मासेमारी करणारे मच्छीमार यांच्या होडीतुन व ग्रामस्थांच्या मदतीने या मुलांच्या मृतदेह शोध कार्य सुरू केले ,मात्र बराच वेळ शोध कार्य केल्यानंतर अमित याचा मृतदेह आढळून आला. त्याचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढुन मांडवगण फराटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले मात्र गेले डॉक्टरांनी अमित याला उपचारापुर्वी मयत झाल्याचे सांगितले विशाल व निखिल यांचा मृतदेह अद्याप ही सापडले नाहीत. पोलीसांच्या मदतीने भिमा नदीच्या पात्रात शोध घेत आहेत.

















