लवकरच गाव भेट दौरा सुरू करणार
भोर : भोर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तळमळीचा विषय असलेल्या राजगड कारखान्यावर सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप होत असून आज पुन्हा एकदा शिवसेना सह संपर्क प्रमुख कुलदीप कोंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपांची प्रतिउत्तर देत आपली सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली असून दि.२१ रोजी राजगड स.सा.का. कार्यक्षेत्रातील शेतकरी व जनसामान्यांच्या कर्मचारी यांचे निवेदन स्वीकारून जागरूक लोकप्रतिनिधी या नात्याने मी आपल्या कारखान्यावर पत्रकार परिषद घेऊन होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला परंतु सत्ताधारी, या पत्रकार परिषदेद्वारे जनसामान्यांच्या भावना मांडण्याच्या हेतूला राजकीय स्टंट संबोधून तमाम शेतकरी व कामगारांचा अपमान करीत आहेत.
पत्रकार परिषदेवळी कुलदीप कोंडे म्हणाले की, भावनिक आश्वासनावर शेतकरी व कामगार यांचे पोट भरत नाही. राजगड स.सा.का. हा तुमच्या वैयक्तिक राजकीय हेतू मुळे अडचणीत आलेला आहे.कारखान्याचा वापर सातत्याने फक्त राजकीय हेतूसाठी केला जातो त्यामुळेच कोनीही बँक कर्ज देण्यास अनुकूल नाही.आपण गेली अनेक वर्षे पिडीसिसी बँकेचे संचालक आहात तरी सुधा कर्ज का दिले जात नाही ? याचे कारण एकहाती सत्ता असून देखील सातत्याने चालू असणारी दिवाळखोरी हे आहे.तुमचे राजकारण तालुक्याच्या विकासाला व शेतकरी व कामगारांना भोवले आहे.तुमच्या राजकारणा मुळे राजगड स.सा.का. वरती कोणीही लक्ष घालत नाही.संचालक मंडळाच्या नाकर्तेपणामुळे आम्हला कारखान्यावर यावे लागते.राजगड स.सा.का. चालवत असताना झालेल्या चुकांवर पडदा टाकण्यासाठी “मीच सर्व केले आहे. या परिस्थिती साठी मीच जबाबदार आहे. “असे सांगून कारखान्याच्या मालमत्तेस धक्का लागू देणार नाही व शेतकरी, कामगार, व्यापारी यांची देणी देणार असे बोलणे म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केलेले राजकारण आहे.
कारखान्यावर कोट्यावधी रुपयांचे कर्ज, निघालेला लीलाव कोणतीही बँक कर्ज देण्यास तयार नसताना केवळ राजकीय निवडणुका पुरती दिशाभूल करून वेळ मारून नेण्याचा प्रकार सत्ताधाऱ्यांनी चालवला आहे.मी स्वतःची मालमत्ता तारन ठेवली आहे” असे सांगून सामान्य शेतकरी, कामगार यांना भावनिक करून ..वारंवार चालणारा वेळकाढूपणा थांबवा व सत्याला सामोरे जाऊन गरीब शेतकरी, कामगारांची देणी द्या.
आम्ही जर वेळोवेळी कारखान्यावर आंदोलन, पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती चा बोलबाला केला नसता तर आपणास जाग आली असती का ? जाग येऊन वार्षिक सर्वसाधारण सभेत आपण येत्या आठ दिवसात उसाचा थकीत एफ आर पी, कामगारांचे पगार व्यापाऱ्यांची देणी देऊ अशी आश्वासने दिली. परंतु महिना होत आला तरी एकही आश्वासन नेहमीप्रमाणे पूर्ण झाले नाही. आश्वासनावर व भावनिक मुद्यावर राजकारण कारण थांबवा कारण त्याने सामान्य शेतकरी, कष्टकरी कामगार बांधवांचे पोट भरणार नाही. भेडसावणारा दुष्काळ त्यात समसूद या मुळे कामगार, शेतकरी हवालदिल झाला आहे त्यामुळे कोती -सबब पुढे न करता गेल्या वर्षीची राहिलेली देयके व कमीत कमी ३००० रु हप्ता देऊन शेतकऱ्याना दिलासा देऊन त्यांची दिवाळी गोड करावी.
राजगड स.सा.का. उशिरा चालू करून कोणता फायदा होणार आहे ? जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांचे बॉयलर पेटले आहेत व गळीत हंगामास सुखात देखील झाली आहे त्यामुळे शेतकर्यांची उर्वरित सर्व देणी देऊन कारखान्याचा गळीत हंगाम दिवाळीपूर्वी चालू करावा.राज्यशासनाच्या पैशावर डोळा ठेऊन वेळकाढूपणा अंगलट येईल, राजगड स.सा.का. ची देणी देणे संचालक मंडळास देणे बंधन कारक आहे.आपल्याला जर वाटत असेल आम्ही कारखान्यासाठी काय केले. गेली २५ वर्ष मिळेल त्या भावात कोणतीही तक्रार न करता कारखान्याला ऊस घातला आहे. आम्ही राजकारण करत असताना कोणताही द्वेष मनात न ठेवता खिलाडू वृत्ती ने सामोरे जातो हे आपण जानता व आपण आमचा खेळ देखील पहिला आहे.वरील सर्व मागण्या मान्य करून शेतकरी, कामगार, व्यापारी यांची देणी देऊन कारखाना दिवाळी अगोदर चालू केल्यास आम्ही सर्व संचालक मंडळाचा हार तुरे नारळ देऊन सत्कार करू अन्यथा दिवाळीच्या अगोदर सर्व देणी देऊन गळीत हंगाम चालू न केल्यास आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा शिवसेना सह संपर्क प्रमुख कुलदीप कोंडे यांनी दिला आहे.